▪️ मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे आगार व्यवस्थापकांना निवेदन..

वणी (प्रतिनिधी) : वणी शहर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित असून शहरासह ग्रामीण भागातील अनेक प्रवासी शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच वैद्यकीय कारणांसाठी छत्रपती संभाजीनगर व हैदराबाद येथे नियमित प्रवास करतात. मात्र वणी येथून या दोन्ही शहरांकडे जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वणी ते छत्रपती संभाजीनगर तसेच वणी ते हैदराबाद अशी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जनतेच्या वतीने मानवी हक्क सुरक्षा परिषद तर्फे करण्यात आली आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी वणी आगारप्रमुख विवेक बन्सोड यांना देण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख परशुराम पोटे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ. सुमित्रा नारायण गोडे, वणी विधानसभा अध्यक्ष बी. आसुटकर, वणी शहर महिला अध्यक्ष सौ. प्रमिला चौधरी, सौ मनिष सुरेंद्र निब्रड, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्ष, संजय चिंचोलकर, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुरेश बन्सोड,वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने , यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बससेवा तातडीने सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
