
वणी : तालुक्यातील आबई फाटा ते वेळाबाई ग्रामपंचयात पर्यंत रस्त्याचे तांत्रिक काम पूर्ण असूनही प्रत्यक्ष बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. मागील काही वर्षांपासून मोहदा परिसरातून होणाऱ्या अवजड खनिज वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या व शेतकऱ्यांना शेतीत नुकसान सहन करावे लागत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वतीने 6 मेपासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. जड वाहतूक थांबवण्यात आली असून, काम सुरू न झाल्यास सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
