

वणी शहरातील: दामले नगर वार्डातील नगर पालिकेने स्वच्छतेची तातडीने दखल घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. नगर पालिकेच्या शौचालय परिसरातील गटारे व मोठ्या प्रमाणात रस्तावर कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असून, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर साचलेल्या कचर्यामुळे मंदिराकडे जाणे कठीण झाले आहे.
याशिवाय, या परिस्थितीमुळे परिसरात डास आणि मच्छर वाढले आहेत, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या घातक आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी वणी नगर परिषदेकडे परिसराची स्वच्छता करण्याची, साचलेल्या गटारांची साफसफाई करण्याची व औषधी फवारणी करण्याची मागणी केली आहे. या समस्येचे तातडीने निवारण न झाल्यास आरोग्याच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
