
वणी येथील राजर्षि शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय पारखी होते. सौ. अनीता टोंगे, प्रतिश लखमापुरे आणि सुनील गेडाम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर विचार मांडले. पारखी सरांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. हरीष वासेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर हरीष बोढाले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

