
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात खालील मागण्यांसाठी होणार आहे:
- ईव्हीएम मशीनमुळे बहुजन समाजाच्या मतांचे मूल्य शून्य झाले असून, मतांची चोरी होत असल्याने बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात.
- ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि शासनात योग्य प्रतिनिधित्व मिळावे.
- महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, 25 फेब्रुवारी 2025 रोजी शेगाव नाका येथे वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन सभा आयोजित केली आहे. या सभेची माहिती चांदुरा जहांगीर येथे देण्यात आली, जिथे संतोष कौतीक्कर आणि बाबा मोहोड यांनी लोकांना मार्गदर्शन केले.
