
वणी – वणी तहसीलमधील सेतु सुविधा केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध कागदपत्रे सहज उपलब्ध होत होती, त्यामुळे नागरिकांचा यावर विश्वास होता.
सदर केंद्र बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जावे लागत असून, यामुळे वेळ आणि आर्थिक भार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, वणीतील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सेतु सुविधा केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली.
या मागणीसाठी अब्दुल निसार, अहमद खाँ पठाण, गुलाम रसूल रंगरेज,तनुकेश जीवने,नूतन सातपुते, अली, उज्वला सातपुते,अनिल सातपुते, वंशिका भरटकर,अनुराग काकडे,जगदीश निमसटकर,शहबाज पठाण, कुणाल भेंडाळे आणि इतर नागरिकांनी पाठपुरावा केला आहे.
