
महाराष्ट्र सरकारने राज्यात प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार आहेत. विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचे काम सुरू असून, या मीटरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना १०% सवलत दिली जाणार आहे. हा बदल सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, लवकरच राज्यभर ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल. ही माहिती दि. ५ मार्च रोजी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवरून न्यू वणी डायरी न्युज प्रोटल ला देण्यात आली आहे.

