
वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा सिमालगत असलेल्या पाटाळा पुलावर मोठे व जीवघेणे खडे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून वरोरा रेल्वे स्टेशन तसेच आरोग्य तपासणीसाठी नागरिक दररोज प्रवास करतात.
हा मार्ग यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा असल्याने येथे वाहतुकीचा ताण मोठा आहे. पुलावरील खड्यांमुळे विशेषतः मोटरसायकल व तीनचाकी वाहनचालकांना धोका वाढला असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डांबरीकरण करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
