▪️वन जमीन अतिक्रमणधारकांचे एसडीओ मार्फत दिले जिल्हाधिकाऱ्यांना व्ययक्तिक अर्ज..

वणी (प्रतिनिधी) : वणी व मारेगाव तालुक्यातील वन जमीन कसणाऱ्यांनी वनाधिकार कायद्यानुसार जमिनीचा पट्टा मिळावा यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेचा वतीने वणी येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी माकप व किसान सभा सातत्याने आंदोलन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार चे वर लोकांना कॉ शंकरराव दानव यांचे नेतृत्वात पट्टे मिळाले. परंतु अजूनही महाराष्ट्रात अनेकांना जमिनीचे पट्टे न मिळाल्याने दिनांक २७ जानेवारी ला महाराष्ट्र सरकारने नाशिक ते खर्डा काढण्यात आलेल्या लाँग मार्च ला आश्वासन दिले.

या आश्वासनानुसार जमीन ताबेदारांनी अर्ज केल्यास दाखल केलेल्या दाव्याची पुन्हा नव्याने छाननी करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दावे दाखल केलेल्या भूमिहीनांना जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया सुरु करावी यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, कॉ गजानन ताकसांडे यांचे नेतृत्वात करण्यात आले. त्या अनुषंगाने वनजमीन कसणाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी यांना व्ययक्तिक अर्ज सादर करण्यात आले.

ह्या आंदोलनात वणी व मारेगाव तालुक्यातील वन जमीन कसणाऱ्या पुरुष व महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचे किसन मोहुर्ले,कवडू चांदेकर, बादल कोडापे, संजय वालकोंडे, सुधाकर सोनटक्के,हरिश्चंद्र चिकराम, अरुण चिंचोलकर, शंकर गौतरे, वसंता नागोसे, रामभाऊ जिद्देवार, श्रीकांत तांबेकर, सुदर्शन टेकाम, नेताजी गेडाम, संभाजी टांगे, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, अमोल चटप आदींनी परिश्रम घेतले.
