
वणी (प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वणी येथील शिवसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त दोन महापुरुषांना मानवंदना अर्पण केली.
स्वराज्याच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगेबाबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करण्यात आला. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, स्वराज्य व शिस्तीचा आदर्श आणि संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश यांचा संगम रायगडाच्या पायथ्याशी अनुभवायला मिळाला.

या स्वच्छता अभियानात अजिंक्य शेंडे, राजु तुरणकर, बंडु चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे व तुषार दुरुटकर या शिवसैनिकांचा सहभाग होता.
“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” हा संदेश देत केवळ जयंती साजरी न करता कृतीतून दोन महापुरुषांच्या विचारांना मानवंदना देण्याचा आदर्श शिवसैनिकांनी घालून दिला.
