
वणी (प्रतिनिधी): आज वणीत सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणीटंचाई. दर चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आणि मध्यरात्री उठूनही नळाला पाणी न येण्याचा त्रास—हा आम्ही सर्वप्रथम संपवणार आहोत. नगराध्यक्ष झाल्यावर वणीकरांचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवू, अशी ठाम घोषणा शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे यांनी अनेक प्रभागांतील मतदारांसमोर केली.
प्रचारादरम्यान त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्या आघाडीवर असल्याचे राजकीय पुढारी वेक्तीच्या सांगण्यावरून संकेत मिळत आहेत.
