
चंद्रपूर – २१ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष मधुकर मालेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवर प्रशासनिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात पालकमंत्री अशोक उड़के, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश होता.

निवेदनात त्यांनी नव्याने सुरू झालेल्या उड्डाण पुलाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे मानवतावादी क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी होते. १९६२च्या भारत-चीन युद्धातही त्यांनी योगदान दिले होते.


यावेळी निवेदन सादर करताना मधुकर मालेकर, नारायण ठेंगणे, संजय भोंगळे, गणेश शेंडे, गणेश वजे आणि घुग्घुस येथील अनेक गुरुदेव भक्त उपस्थित होते. मंडळाने प्रशासनाला ही मागणी तात्काळ मान्य करण्याचे आवाहन केले, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

