
वणी (प्रतिनिधी): सम्राट अशोक नगर येथे असलेले सर्वात जुने बौद्धविहार जीर्ण झाल्याने ते जमीनदोस्त करून नवीन बौद्धविहार उभारण्याचा संकल्प समाज बांधवांनी केला आहे. जुन्या विहाराचे बांधकाम करताना उरलेल्या विटा व मलबा काही गैरअर्जदाराने याआधीच चोरून नेल्याची समाजाला माहिती झाली होती; मात्र तो संबंधित समाजातीलच व्यक्ती असल्याने कोणतीही कारवाई तेव्हा करण्यात आली नाही.
मात्र दि. ३०-११-२०२५ रोजी सायंकाळी अंदाजे ६.१८ वाजता आणि दि. ०५-१२-२०२५ रोजी सकाळी अंदाजे ६.०३ वाजता संबंधित गैरअर्जदार आपल्या घरातून बाहेर पडून विहाराचे लोखंडी अँगल नेत असल्याचे राकेश पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. असे समाज बांधवांनकडून सांगण्यात येत आले.
नवीन बौद्धविहाराच्या बांधकामासाठी बाजारातून साहित्य आणल्यानंतरही तो चोरीचा प्रयत्न करू शकतो, अशी भीती समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी सम्राट अशोक नगर, वणी येथील समाज बांधवांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये लिखित तक्रार दाखल केली असून गैरअर्जदारावर चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
