
वणी (प्रतिनिधी): वणीजवळील शिरपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणेश डाहुले, उपसरपंच मोहित चचडा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रमोद मंदे, पोलीस पाटील सुवर्णा बोंडे, लता फेतफुलवार, वासुदेव मंदे तसेच नत्थुजी उरकुडे उपस्थित होते.

यावेळी खुशी माहुरे हिने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. तर नागेश गोरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आणि आदर्श शासनव्यवस्थेचा गौरव करत त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद फेतफुलवार यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मधुमती बोधे यांनी केले, तर विनोद मंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बोधे, दिवाकर घोरुडे, अनिकेत घोरुडे, सुमित घोरुडे, सूरज उरकुडे, आदित्य माहुरे, शंकर चामाटे, सुभाष नीर, तेजस बोधे, लता गोरे, अनिता घोरुडे, माधुरी मंदे, वंदना बोधे, चंद्रकला बोधे, आशा गोरे, आशा घोरुडे, रेखा घोरुडे, मनीषा घोरुडे, बेबी घोरुडे, सपना बोधे, ललिता नीर, माया उरकुडे, रुंदा उरकुडे आणि रुंदा मंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या आदर्श कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
